जालना जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. जालना जिल्ह्यातील काही नोंदी...
या सर्वेक्षणात अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी जालना जिल्ह्यातील विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन संस्थेच्या लक्ष्यित घटकांतील कुटुंबांशी संवाद साधला. नागरिकांच्या अडचणी, त्यांना आवश्यक असलेल्या शासकीय योजना, रोजगार, शिक्षण, आरोग्य, विमा, शेती व स्वयंरोजगाराशी संबंधित गरजा यांची सविस्तर माहिती या भेटींमधून घेण्यात आली. अनेक कुटुंबांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती अद्याप पोहोचलेली नसल्याचेही प्रत्यक्ष संवादातून दिसून आले. विशेषतः खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी शासकीय योजनांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचे प्रकर्षाने जाणवले.
सर्वेक्षण करत असताना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण, आरोग्य विमा, स्वयंरोजगार, कृषीपूरक व्यवसाय आणि युवकांसाठी उपलब्ध संधी याबाबत माहिती दिल्यानंतर नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
परिवार सर्वेक्षणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांची सहकार्याची भावना आणि योजनांविषयी त्यांनी दाखवलेली उत्सुकता यामुळे अमृत संस्थेच्या जालना टीमला अनेक सकारात्मक अनुभव घेता आले. समाजामध्ये निर्माण झालेला उत्साह पाहून सर्वेक्षण कार्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली.
अनेक ठिकाणी नागरिकांनी शासकीय योजनांबाबत उत्सुकता दाखवून अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. योग्य मार्गदर्शन आणि माहिती मिळाल्यास समाजाच्या विकासाला अधिक गती मिळू शकते, हे जाणवले.
- नितीन खेकाळे
जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत
चिंतेश जोशी
जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अश्विनी कुलकर्णी
अमृतसखी
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment